विश्वव्यापक संसर्गजन्य रोगांचा इतिहास


1.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       जागतिक आरोग्य संघटनेनं ‘कोविड - १९’ या कोरोना विषाणू मुळे होणाऱ्या आजाराच्या साथीला  ‘विश्वव्यापक साथीचा  रोग ’ म्हणून जाहीर केले आहे. या रोगाची सुरवात २०१९ च्या अखेरीस चिन मधील वुहान शहरात झाली आणि तेथून ती आता जगभर पसरत आहे. या रोगास प्रतिबंध करण्यासाठी  साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करावी लागत आहे. अद्याप तरी या रोगास ठोस असे औषध किंवा लस उपलब्ध नाही. परंतु विज्ञानातील प्रगतीमुळे आणि अनुभवाने यावर लवकरच उपाय निघेल असा आशावाद सर्वांनाच आहे. वैज्ञानिक त्यासाठी प्रयत्न करीतच आहे आणि त्यामुळे या साथी नोंदही हि इतिहास जमा होणार असली तरी आज मात्र हे एक नैसर्गिक संकट आपल्यासमोर उभे आहे.
2.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               तसे पाहता मानवास अगदी प्राचीन काळापासूनच अनेक नैसर्गिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. निसर्गातील अनेक घटकासोबत त्याने सामना केला लागला आहे. उदा. भूकंप, महापूर इत्यादी. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांशी केलेल्या लढ्याचाही समावेश होतो. सजीव सृष्टी व त्यातील घटकांमध्ये सतत नैसर्गिक बदल होत असतात आणि हे अखंडपणे चालूच राहते. याला अपवाद निसर्गामध्ये असणाऱ्या  सूक्ष्मजंतूंचाही नसतो. सूक्ष्मजंतूंमध्ये तर हि प्रक्रिया खूप जलदगतीने सुरु असते. सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू असतात. संसर्गजन्य आजार हे प्रामुख्याने रोगकारक सूक्ष्मजंतूंमुळे होतात. खूप कमी प्रकारचे सूक्ष्मजंतू मानवी शरीरामध्ये रोग निर्माण करणारे असले तरी मानवी इतिहासात त्यांचे प्रबळ अस्तित्व दिसून येते. त्यांच्याशिवाय मानवी इतिहास लिहिला जावू शकत नाही हे मात्र नक्की. मानवाने त्यांच्याशी दिलेला लढा अतिशय रोमांचकारी आहे.संसर्गजन्य आजारामुळे मानवी जीवनावर प्रचंड मोठा परिणाम झालेला दिसून येतो. यामुळे मानवी अर्थशास्त्र , संस्कृती , राहणीमान , राजकारण इत्यादी  गोष्टींवर थेट परिणाम झाला आहे.
प्राचीन काळी जसे मानवाचे नागरिकीकरण सुरु झाले तसे संसर्गजन्य आजारांचा फैलाव सूर झाल्याचे दिसून येते. लोकसंख्या जरी कमी असली तरी मनुष्याचे अगदी एकमेकांजवळ तसेच प्राण्यांजवळ राहणे, स्वच्छतेबाबतचे अपुरे ज्ञान आणि निष्काळजीपणा, सात्विक आहाराचा अभाव इत्यादी गोष्टीमुळे असे आजार फैलावण्यासाठीचे पूरक वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत मनुष्य भटक्या किंवा शिकारी अवस्थेत होता तोपर्यंत अशा आजारांचे प्रमाण खूप कमी होते. आजच्या  इराकइराण ह्या प्रदेशात नागरिकरणाला सुरुवात झाली. पृथ्वीवर अनेक ठिकाणी नागरी संस्कृती उदयास आल्या. नागरीकीकरणांमुळे मनुष्य वस्ती वाढली. त्यानंतर विविध प्रांतातील लोक एकमेकाकडे जावू लागले व त्यामुळेच  विश्वव्यापक संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढायला लागला.
     संसर्गजन्य रोग एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्ती कडे  अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य अशा  कणांमुळे पसरतात   असे मत गिरोलामो फ्रॅकस्टोरो यांनी इसवी सन १५४६ मध्ये एका पुस्तकात  मांडले आहे. हे कण प्रत्येक रोगासाठी वेगवेगळे असतात. ते अगदी बरोबर होते.त्याने हे कण तीन मार्गांनी पसरतात हे देखील सांगितले. ते म्हणजे एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या संपर्कात आल्या मुळे, एकमेकांच्या वस्तू वापरल्याने आणि हवेमार्फत. परंतु त्याचं म्हणणं सिद्ध होण्या साठी  तब्बल  २०० वर्षे लागली. त्याचे  हे विचार तेव्हाच्या काळाच्या  खूपच पुढे होते.सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर सूक्ष्मजीव आपल्याला समजले आणि त्याचं म्हणणं पटलं. यानंतर सूक्ष्मजीवांचा अभ्याससुरु झाला आणि संसर्गजन्य रोगांचं मूळते कशा पद्धतीने रोग उत्पन्न करतातते कसे टाळता येतील या प्रश्नांची उत्तर मिळत गेली.
प्लेग हा इतीहासातील सर्वात महत्वाचा संसर्गजन्य रोग आहे. ह्या रोगामुळे मोठी मानवहानी झाली.   पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेवढे लोक बळी पडले नव्हते त्यापेक्षा जास्त लोक यामुळे मरण पावले.  इसवी सन पूर्व १६० ते १८० च्या कालखंडात  युरोप मध्ये हि  भयंकर साथ आली होती. जवळपास ५० लाख लोक  प्लेगमुळे मरण पावले आणि त्यामुळे रोमन साम्राज्य संपले. रोमन साम्राज्य नष्ट व्हायला शेवटचा जबरद्स्त घाव प्लेगनेच घातला.
त्यानंतर सुमारे ४०० वर्षानंतर चौदाव्या शतकात  युरोप मध्येच दुसऱ्यांदा अशी साथ आली. याला ‘ब्युबॉनिक प्लेग ’ ( लसिका ग्रंथीचा प्लेग ) असे संबोधले गेले होते. यामुळे युरोप मधील जवळपास ५० % लोक मृत्युमुखी पडले. प्रतिदिन सुमारे ५००० लोक मृत्यूला सामोरे जात होते. या साथीमध्ये युरोपियन जनतेच्या एकूण बळींची संख्या २५ दशलक्षच्या जवळपास होती. बुबोनिक प्लेग चा हा पहिला मोठा आघात होता.  युरोपियन लोक यातून सावरण्यापूर्वीच पुढे इसवी सन  १३४५  मध्ये  बुबोनिक प्लेगची पुन्हा साथ धडकली. ही साथ इटली आणि इजिप्त तसेच आफ्रिका आणि आशिया मध्ये पसरली. जवळजवळ ७ वर्षे हि साथ होती. या कालावधीत  ७५ ते २०० दशलक्ष जनता या रोगाला बळी पडली. या साथीला ‘काळा मृत्यू’ म्हणून सुद्धा ओळखण्यात येत होते.
या भयंकर साथीतूनच विलागीकरणाची  (क्वारंटाइनची) कल्पना व्हेनिसमध्ये उदयास आली. पौर्वात्य देशांकडून येणाऱ्या जहाजांचे ते प्रमुख बंदर असल्यामुळे व जहाजावरून येणाऱ्या संसर्गित मालामुळे प्लेग उद्‌भवतो अशा कल्पनेने व्हेनिशियन लोकांनी संशयित जहाजे, त्यांवरील माल व माणसे अलग ठेवण्यासाठी व सर्वसाधारण दळणवळणात मिसळू न देण्याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्लेगाचे रोगी गावाबाहेर शेतात नेऊन ठेवणे, तसेच प्लेगाच्या रोग्याची शुश्रुषा केलेल्या व्यक्तीने किंवा रोग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीने १४ दिवस विलग्नवासात राहण्याचा आदेश होता. हे कालमान इतरत्र हळूहळू ४० दिवसांपर्यंत वाढविण्यात आले. पुढे इटली, द. फ्रान्स व आजूबाजूच्या देशांतूनही विलग्नवासाच्या कल्पनेचा प्रसार झाला. लागोपाठच्या या साथीं मुळे युरोपात झालेले नागरीकरण नष्ट झाले.  इतकी मोठी मनुष्य हानी करणारा  हा रोग उंदराच्या शरीरावरील पिसवांमार्फत पसरतो हे समजायला  कित्येक वर्षे गेली.
१८९४ मध्ये चीन ( हाँगकाँग ) मध्ये प्लेगची साथ आली व तेथून ती भारतात पसरली. याच वेळी  फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ए.ई.जे.यर्सिन यानी या  रोगाचे जंतू शोधले. किटाझाटो या जपानी सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांनी सुद्धा  त्याच वर्षी स्वतंत्ररीत्या हे सूक्ष्मजंतू ओळखले होते. या जीवाणून यर्सिनिया पेस्टीस असे नाव देण्यात आले होते. दोन वर्षानंतर मुंबईमध्ये सायमंड यांनी उंदराच्या शरीरावर असणाऱ्या पिसवा कशाप्रकारे  रोग संक्रमित करतात हे दाखवून दिले.  १८९७ मध्ये प्लेगची लस शोधण्यात आली. त्यामुळे खूप प्रमाणात हा रोग नियंत्रणात आला. तत्पूर्वी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत भारतात काही भागांत प्लेग उद्‌भवला होता. भयकंर दुष्काळानंतर गुजरात, काठेवाड आणि कच्छमध्ये १८१५ मध्ये साथ उद्‌भवली. १८३६ मध्ये राजपुतान्यातील पाली या गावी जोरदार लागण झाली आणि तेथून हा रोग अजमीर मारवाडात पसरला परंतु १८३७ च्या कडक उन्हाळ्यात साथ पूर्णपणे मंदावली. १८४९, १८५० आणि १८५२ या वर्षी साथीचा प्रसार दक्षिणेकडे झाला. १८७६-७७ मध्ये प्लेगाची लक्षणे असलेला जोरदार रोग उद्‌भवला व त्याला भारतीय लोकांनी महामारीअसे नाव दिले होते. ग्रंथिक सन्निपातआणि गाठीचा तापअशी नावेही या रोगाला होती. १८९६ - १९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. भारतात शेवटची साथ १९९४ मध्ये आली.याची सुरवात  सुरत शहरात झाली  पण सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले. यावेळेस फक्त ५६ लोकच मरण पावले. रोगाची माहितीत्याविषयीचं ज्ञान तातडीचे उपाय यामुळे जास्त प्रमाणात हा रोग पसरू शकला नाही.
प्लेगनंतर मनुष्याने मुकाबला केलेला संसर्गजन्य रोग म्हणजे रोग म्हणजे देवी. हा रोगही तसा धोका दायकच होता परंतु प्लेगच्या मानाने ह्या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होते.  इसवी सन पूर्व १३५० मध्ये देवीच्या रोगाच्या साथीचा पहिला उल्लेख सापडतो. तोदेखील इजिप्तमध्येच.जेव्हा युरोपियन लोक वसाहती करण्यासाठी जगभर फिरायला लागले तेव्हा त्यांनी आपल्या सोबत  देवी  आणि  इतर  रोगांचा प्रसार केला. स्पॅनिश लोक जेंव्हाअमेरिका खंडात पोचले तेव्हा हा रोग तिथे नव्हता. पण थोड्याच कालावधीत तिथे युद्ध आणि सोबतच विविध  रोगांच्या साथी पसरायला सुरुवात झाली. या सर्व गोष्टींमुळे  ९० % स्थानिक अमेरिकन लोकसंख्या नष्ट झाली. यात देवीच्या रोगाचा मोठा वाटा होता. अशाप्रकारे देवीच्या रोग इतिहासात महत्वाचा आहे. युरोपबरोबरच  हा रोग पृथ्वीवर सर्वत्र पसरला होता. पण आफ्रिकाचीन आणि भारत इथे या रोगामुळं  होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत. याचं कारण म्हणजे इथे या रोगाची लस उपलब्ध होती. या रोगातून जे लोक वाचतात त्यांना हा रोग परत होत 
नाही असं निरीक्षण होत. हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि एकदा रोग झाला की रोग्याच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते  हि  संकल्पना  या  देशातील  लोकांना  माहित  नव्हती. तरी देखील देवी  झालेल्या  व्यक्तीच्या शरीरातून  काही कण काढून ते निरोगी व्यक्तींच्या शरीरात लहान पणीच टोचवले जात. त्यामुळे बऱ्याच लोकांना अशी लस लहानपणीच मिळायची. त्यामुळे तिथे हा रोग युरोप इतका पसरला नाही. या लसीचा प्रसार कालांतराने युरोपमध्ये देखील झाला. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने ही लस बनवली. त्याच्याकडे येणाऱ्या गवळ्याच्या मुली या एकदा त्याला सांगत होत्या कीदेवीच्या रोगाची साथ आली तरी त्यांना हा रोग होणार नाहीकारण त्यांच्या हातावर पुरळ येऊन गेली आहे. जेन्नरने जेव्हा यामागचं कारण शोधलं तेव्हा तो  आश्चर्यचकित  झाला. कारण त्या मुली खरं सांगत होत्या. गायीच्या स्तनावर देवी सदृश पुरळ यायची. दूध काढताना त्याची लागण काढणाऱ्या व्यक्तीला देखील व्हायची. पण त्यामुळे त्याला देवीच्या रोगाची रोगप्रतिकारक क्षमता येऊन जायची. गायीला ही पुरळ देवीच्या विषाणूच्या प्रजाती विषाणूमुळे होत असे.  याचाच वापर करून जेन्नरने देवीची लस बनवली आणि संपूर्ण मानवजातीला या रोगापासून मुक्त केले. या रोगाचा खरा वापर जैविक युद्धात करण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात झाला. सुदैवाने ते सगळे प्रयत्न यशस्वी नाही होऊ शकले. पण रशिया-अमेरिका शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देशांनी कृत्रिमरीत्या या रोगाची साथ पसरवण्या चा खूप प्रयत्न केला. आज देखील या दोन्ही देशांच्या प्रयोग शाळेत देवीचे विषाणू जतन करून ठेवलेले आहेत.
प्लेगनंतर पटकी ( कॉलरा ) च्या विश्वव्यापक  साथीच्या नोंदीही इतिहासात झाल्या आहेत. एकूण ७ वेळा आलेल्या साथी पैकी तिसऱ्या वेळी आलेली साथ सर्वात मोठी होती. इसवीसन १८५२ ते १८६० च्या कालखंडात हि साथ आली होती. याची सुरवात भारतातून होवून संपूर्ण आशिया , युरोप , उत्तर अमेरिका आणि आफ्रिका मध्ये पसरली होती. यावेळी सुमारे १० लाख लोक मृत्युमुखी पडले होते. १८५४ मध्ये ब्रिटीश शल्यचीकीत्सक जॉन स्नो लंडन च्या दुर्लक्षित भागात काम करीत असताना दाखवून दिले कि पटकी चा प्रसार हा दुषित पाण्यामुळे होतो. याच वेळी ग्रेट ब्रिटन मधील पटकी मुळे मृत्यूंची संख्या २३००० इतकी होती.
१९१० ते १९११ या कालावधीत पटकीची सहाव्यांदा पुन्हा साथ आली होती. यामध्ये 8 लाख पेक्षा जास्त रुग्ण दगावले. याची सुरवातहि भारतातूनच होवून मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, पूर्व युरोप आणि रशिया मध्ये पसरली होती. अमेरिकेमध्येही यावेळी रुग्ण आढळळे होते.  परंतु अमेरिकेच्या आरोग्य विभागाने पूर्वीच्या साथीतील अनुभवाने रुग्णांचे विलगीकरण करून साथ आटोक्यात आणली होती. अमेरिकेमध्ये यावेळी केवळ ११ लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेमध्ये १९२३ नंतर पटकीच्या रुग्णांची संख्या एकदम कमी झाली परंतु भारतामध्यें  परिस्थिती बदलली नव्हती.
यानंतर विश्वव्यापक संसर्गजन्य साथीच्या यादीत नाव येते ते सर्दी ( फ्ल्यू ) या विषाणूजन्य आजाराचे. हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. १८८९-९० साली पहिल्यांदा याची साथ आली. सुरवातीला या आजाराला एशियन फ्ल्यू किंवा रशियन फ्ल्यू असे म्हणले जायचे. इन्फ़्लुएन्ज़ा–ए या विषाणूच्या H3N8 या प्रजातीमुळे या रोगाची साथ आली होती. सुरवातीला मध्य आशिया , कॅनडा आणि ग्रीनलंड मध्ये याचे रुग्ण आढळळे होते. १९ व्या शतकामध्ये शहरी भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे याचा प्रसार गतीने झाला होता. यामध्ये सुद्धा सुणारे १० लाख लोकांचा बळी गेल्याची नोंद आहे.
१९५६ ते १९५८  या कालावधीत इन्फ़्लुएन्ज़ा–ए या विषाणूच्या H2N2 प्रजातीमुळे चीन मध्ये साथ आली. याचा प्रवास चीन मधून सिंगापूर, हॉंगकॉंग आणि युनायटेड स्टेटस् मध्ये झाला. सुमारे २० लाख लोक यावेळी मृत्युमुखी पडले होते, यापैकी ७० हजार युनायटेड स्टेटस् मधील होते.
१९६८ साली इन्फ़्लुएन्ज़ा–ए या विषाणूच्या H3N2 प्रजातीमुळे साथ आली. १३ जुलै १९६८ रोजी हॉंगकॉंग मध्ये याचा पहिला रुग्ण आढळला आणि केवळ १७ दिवसातच सिंगापूर आणि विएतनाम मध्ये या रोगाचा प्रसार  झाला तर केवळ पुढील तीन महिन्यात फिलीपायीन्स, भारत , ऑस्ट्रेलिया , युरोप आणि युनायटेड स्टेटस् मध्ये याचा फैलाव झाला. यावेळी सुद्धा १० लाखापेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. त्यापैकी ५ लाख हॉंगकॉंग मधले होते.
१९१८ ते १९२० च्या कालखंडात फ्ल्यूने साऱ्या जगात पुन्हा हाहाकार माजवला. जगातील एक तृतांश लोक यावेळी बाधित झाले होते व त्यापैकी सुमारे २० ते ५० दशलक्ष लोक दगावले. यावेळी मृत्यूचा दर  १० ते २० % इतका होता. यावेळचे वैशिष्ट म्हणजे वयोवृद्ध व लहानमुला पेक्षा तरुण व सशक्त लोकांमध्येच हा आजार होत होता.
त्यानंतर २००४ मध्ये फ्ल्यू चा  विषाणू नवीन रुपात आला. त्याने सुरवात केली कोंबड्यांमधून . तेथून  माणसा मध्ये हा विषाणू संक्रमित झाला. तसे पाहता १९९७ मध्येच व्हिएतनाम आणि थायलंड मध्ये याची सुरुवात झाली होती पण २००४ मध्ये त्याचा प्रभाव वाढला. याचं वर्गीकरण  H5N1 असं झालं आणि नाव बर्ड फ्ल्यू असे दिलं गेलं. याची व्याप्ती १० देशामध्ये होती.  पण या विषाणूच हे रूप पूर्णपणे वेगळं होतं. यावर अभ्यास सुरु असतानाच   २००९ मध्ये या विषाणूने  अजून एक हल्ला केला. पुन्हा परिस्थिती गभीर झाली.  याचा प्रकार होता H1N1. १९१८ सालाचाच  विषाणू  परंतु   जनुकीय रचना त्याच्या पेक्षा खूपच  वेगळी होती. कालांतराने  लक्षात आलं की हा एक पूर्णपणे नवीन विषाणू असून तो  डुक्करपक्षी आणि माणसां मधील विषाणूंच्या एकत्रिकरणातून निर्माण झाला आहे. त्यामुळे याच नाव ठेवण्यात आलं स्वाईन फ्ल्यू. यावेळेस तो अमेरिकेत उदयाला आलापण परत एकदा तो शिया  खंडातच फोफावला. महाराष्ट्रातही त्याचा मुक्काम होता. एका विशिष्ट भागातच सर्दीने आपला मुक्काम दीर्घकाळ केल्याचा इतिहास यापूर्वी नव्हता तेव्हा पासून दर वर्षी कमी जास्त प्रमाणात याच्या केसेस आढळतात . या साथीचा कुठलाही एक विशिष्ट असा पॅटर्न नाही. त्याचा उगम कसाही होऊ शकतो. फ्ल्यू चा अभ्यास अजून चालूच आहे. पोलिओदेवी यासारखे विषाणूजन्य रोग  आपण प्रभावी लस आणि प्रयत्नांनी जवळपास नामशेष केले पण फ्ल्यू  आपल्याला अजूनही
हुलकावण्या देत आहे. आपल्या प्रयत्नांना भविष्यात नक्की च यश येईल अशी आशा आपण नक्कीच बाळगू शकतो.
सर्दीनंतर एड्स या रोगाचा उल्लेख देखील विश्वव्यापक संसर्गजन्य रोगांच्या यादीत केला आहे. १९७६ साली मध्य आफ्रिका मध्ये याचा पहिला रुग्ण आढळला. १८८१ पासून आत्तापर्यंत सुमारे ३६ दशलक्ष लोकांचा बळी याने घेतला आहे तर ३१ ते ३५ दसलक्ष याने बाधित आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हणजे ५ % लोक आफ्रिकेमधील आहेत.
या रोगावर आजदेखील कुठलीही लस किंवा खात्रीलायक इलाज उपलब्ध नाही. हा विषाणूजन्य रोग थेट मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करून तिला निकामी करून टाकतो. त्यामुळे रोगी विविध आजारांना बळी पडून शेवटी दगावतो. या रोगाचा उगम म्हणजे मानवात नाही,   तर  एका सस्तन प्राण्यात झाला. तिथून हा विषाणू मानवा मध्ये आला असे मानले जाते.  त्यानंतर  काही समलैंगिक पुरुषां मध्ये  हा रोग आढळून आला. विविध मार्गानी हा पसरत असला तरी लैंगिक संबंध हाच याचा महत्वाचा मार्ग राहिला आहे.  इतर विकसनशील देशांमध्ये देखील हा विषाणू चांगलाच पसरला. जनजागृती आणि नवनवीन औषधोपचार मुळे हा रोग आता थोडा नियंत्रित आहे. . याची लस देखील लवकरच उपलब्ध होईल याची आशा आहे.
क्षयरोग हा तसा जुनाच जिवाणूजन्य रोग असला तरी अलीकडे ह्या रोगाचा धोका खूप वाढला आहे. याचे 
मुख्य कारण म्हणजे या जिवाणुंमध्ये वाढत चाललेला प्रतिरोध.  या रोगांवर इलाज उपलब्ध आहे परंतु तो दीर्घकाळ चालतो.  मध्येच जर इलाज थांबला तर हा जिवाणू प्रतिजैविकांना दाद देईनासा होतो आणि रोग आणखी बळावतो. मुख्यत्वे गरीब देशांमध्ये या रोगाने आपले हातपाय पसरले आहेत. अस्वच्छतागरिबीअशिक्षितपणा या कारणांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आहे. जगातील एकतृतीयांश लोकसंख्या या जिवाणूंनी संक्रमित असते ही एक धक्कादायक बाब गेल्या काही वर्षात समोर आली आहे.
सिफिलिस हा त्यानंतरचा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा संसर्गजन्य रोग. याचा उदय  साधरणतः १४९० मध्ये झालेला आढळतो.  तेव्हा  हा  रोग  स्पेन इटली आणि फ्रान्स या देशां मध्ये एक त्वचा विकार म्हणून पसरला. पुढील ४० वर्षात सिफलिसने चांगलंच बस्तान बसवलं. हा एक लैंगिक आजार. पण ह्याचा उगम एका त्वचा विकारातून झाला.उत्क्रांती होत हा रोग लैंगिक आजार म्हणून प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध लोकांना हा रोग झाल्यामुळे या रोगाला प्रसिद्धी मिळाली.  हा रोग चार वेगवेगळ्या टप्प्यांवर वाढत जातो. शेवटच्या टप्प्यात हा रोग शरीराच्या इतर भागात पसरतो. हेच काही राजांच्या बाबतीत झालं. त्यामुळे देखील या रोगाला 
लोक घाबरायला लागले. परंतु युरोपच्या बाहेर या रोगाचा प्रसार फारसा नाही झाला. पाहिलं प्रतिजैविक पेनिसिलीन या रोगासाठी खूपच परिणामकारक ठरलं. याने जवळपास सिफिलिसचा नायनाट केला. आज अगदी काही तुरळक केसेस सापडतात. त्यामुळे हा तितकासा धोकादायक राहिलेला नाही.
याव्यतिरिक्त अगदी अलीकडच्या काळात अनेक संसर्गजन्य रोगांचे आव्हान मानवासमोर आले आहे. उदा. डेंग्यू, चिकनगुनिया,इबोलाझिका ,सार्स  रोगांच्या साथी गेल्या काही वर्षात आल्या. विज्ञानातील प्रगतीमुळे आणि इतिहासातील अनुभवामुळे या साथी आपण आज लगेच थोपवू शकलो. कोरोनाच्या साथीबाबत सुद्धा असाच आशावाद सर्वांनी ठेवला पाहीजे. कोरोना विषाणूची उत्पत्ती बाबत सुद्धा मतभिन्नता आहे. सुप्तावस्थेतील विषाणूचे रुपांतर झाले कि विषाणूंच्या जनुकीय रचणेमध्ये नैसर्गिक बदल झाला कि प्रयोगशाळेत हेतुपुरस्कर हा विषाणू तयार केला यावर चर्चा करण्यापेक्षा आलेली साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. इतिहासातून  धडा घेवून आपण यश मिळवलेच पाहिजे. आणि त्याच वेळी कधीही या सूक्ष्मजीवांना कमी  लेखून चालणार नाही हे समजून घेतले पाहिजे. आज उपलब्ध असलेली अनेक प्रतिजैविके जीवाणूजन्य आजारांना उपयोगी पडत नाहीत. जीवाणूमध्ये प्रतिरोध निर्माण होत आहे. हे जर वाढतच गेले तर साथीचे रोग नियंत्रित करणे कठीण होईल. असे रोग कधीही उग्र रूप धारण करू शकतिल. त्यामुळे आपली जीवनशैली बदलून आपली प्रतिकार शक्ती वाढविणे आणि अशा आजारापासून स्वत: लांब राहून इतरानाही होणार नाही याबाबत दक्षता घेणे हेच योग्य ठरेल. 

प्रा. डॉ. गजानन माळी , एम.एस्सी.,पीएच.डी.
विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, भारती विद्यापीठाचे एमबीएसके कन्या महाविद्यालय , कडेगाव
                                    जि, सांगली gajamali@rediffmail.com ९८८१८१३३०६ 

Comments

  1. Tumhi khup strick hotat bahutek mhanun me ashi the...mala Jr p.hd.karayachi permission milali tr mala guide karal ka?..... Kaminee Sanjay shinde.

    ReplyDelete
  2. Tumhi khup strick hotat bahutek mhanun me ashi the...mala Jr p.hd.karayachi permission milali tr mala guide karal ka?..... Kaminee Sanjay shinde. Now kaminee ravikant ghatge.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Department of Microbiology, BVP's MBSK Kanya Mahavidyalaya, Kadegaon ALUMNI PHOTO 1994-2019

८ मार्च २०२४....जागतिक महिला दिनानिमित्त....